21.3 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

माणसाचे माणसा सोबत असलेले माणुसकीचे नाते हेच बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू होय – भिक्खू धम्मशील थेरो

माणसाचे माणसा सोबत असलेले माणुसकीचे नाते हेच बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू होय – भिक्खू धम्मशील थेरो

माजलगाव ( वार्ताहार ) माणसाचे माणसा सोबत असलेले माणुसकीचे नाते हाच बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे, म्हणून माणूस असाल तर माणसा सारखे वागले पाहिजे.जी माणसे माणसा सोबत उचित व्यवहार करतात तीच माणसे खरी सुखी असतात.समस्त मानव जातीला मनुष्यत्व प्राप्ती साठी बुद्ध धम्मा शिवाय पर्याय नाही.असे प्रतिपादन आपल्या साप्ताहिक प्रवचनात पूज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी केले.

सदधम्म सेवा संघाच्या वतीने श्रावस्ती बुद्ध विहार केसापुरी वसाहत येथे साप्ताहिक धम्मदेसनेच्या प्रवचन मालिकेत दि.8 सप्टेंबर 2024 रोजी पू. भिक्खू धम्मशील थेरो आपल्या मानवी जीवनात बुद्ध धम्माचे महत्त्व या विषयावरील प्रवचन मालिकेत पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. पुढे बोलताना भिक्खू म्हणाले की,

बुद्धाचा धम्म हा बहुआयामी असून माणसाचे मंगल होण्यासाठी सर्वांगीण मार्ग सांगतो. मानवी जीवनाचा उत्कर्ष बुद्ध धम्मातच असल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्षाच्या काळात विविध धर्माच्या अभ्यासानंतर बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला.धम्म मनोरंजनाचा नाही तर, धम्मात नीतीमतेला स्थान आहे. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म आहे.

इथे मनाला विचारांचा आहार दिला जातो. आपले वर्तन सुधारायचे असेल तर केवळ मनोरंजन करून जमणार नाही. खरा धम्मरस समजून घ्यावा लागेल.
अर्थात धम्माचा उद्देश समजून घ्यावे लागेल. यापैकी पहिला उद्देश माणसाने मनुष्यत्व प्राप्ती करून घेणे आहे.
माणूस असाल तर माणसा सारखे वागा केवळ माणसासारखे दिसणे दिसणे अपेक्षित नाही. माणसाने जनावरासारखे वर्तन करू नये. असे दुर्गुण नष्ट करून माणसाने माणसासोबत असलेल माणुसकीचे नाते जपणे गरजेचे आहे.आणि हीच बुद्ध धम्माची खरी शिकवण आहे. माणसातील पशुत्व नाहीसे करणारे औषध म्हणजे बुद्ध धम्म होय.

आजच्या पूजेचे यजमान लताताई मथुरादास बनसोडे आणि ज्योतीताई तेजसकुमार बनसोडे  त्यांच्या वतीने उपस्थितांना भोजनदान देण्यात आले. 

प्रसंगी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कणके यांचा सपत्नीक तर, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे शिवाजी धाईजे, वसंतराव जावळे, माजी नगरसेवक सचिन डोंगरे, माजी जि .प . समाज कल्याण सभापती गयाताई आव्हाड,वंचित आघाडीचे धम्मानंद साळवे,अंकुश जाधव,पूजेचे यजमान बनसोडे परिवार  यांचा सद् धम्म सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड दशरथ मकसरे यांनी केले तर,आभार सदाशिव भालेराव यांनी मानले.
या वेळी सद् धम्म सेवा संघाचे अरुण नाकलगावकर, श्यामराव वाघमारे, भगवानराव सातपुते, पांडुरंग जाधव, रविकांत उघडे, सोपानराव उजगरे, एम.बी.चांदमारे,
जी एन घनगाव, वाल्हाबाई टाकणखार, लिलाबाई उजगरे, हे उपस्थित होते. तर राजश्री शाहू शिक्षक पथसंस्थेचे अध्यक्ष कपिल डोंगरे, मनीषा सिद्धार्थ ढवळे, शांताबाई साळवे, सुशीलाताई चांदमारे, पुनमताई धाईजे,दीपक भालेराव,बबनराव खोपे,विलास साळवे,राजरत्न खळगे,मनोरमाताई सोनवणे,आशाताई शिरसट, लक्ष्मणराव बनसोडे, गोविंदराव टाकणखार,नवनाथ गायकवाड, प्रा.संजय बागुल,अनिताताई वाघमारे,मीरा वाघमारे,कमलबाई श्रीमंतराव डोंगरे,सुधामती जावळे,इत्यादी बौद्ध उपासक उपासिका माजलगाव शहर आणि ग्रामीण भागातून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!